मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Friday 14 December 2018

आणि डॉ.काशिनाथ घाणेकर

काल मला रात्री 1नंतर सगळीकडे लाल्या आणी संभाजी दिसत होते. 😊

ते पण उसमें क्या है..’ ,"एकदम कडsssक"  .....😆 

काय?

अहो! खरच एवढा चिकना,गोरा पान,निळसर डोळे,समोरचे केस मागे करण्याची ति स्टाईल यामुळेच अखंड त्याच्या प्रेमात बुडाले म्हणजे  सुबोध च्या (तो वयाने कितीही मोठा असला तरिही सर नाही म्हणार एकेरी च हाक मारणार 😉)

आणि प्रत्यक्ष खरच डॉ.काशिनाथ घाणेकरांना यांना बघण्याची संधी मिळाली असती तर मग विचारुच नका. 🙆‍♀😄😜

डॉ.काशिनाथ घाणेकर यांचे नाव ऐकून होते.पण चित्रपट बघायला जायचे ठरल्यावर.मी काही interview बघितले 
,लेख वाचले, काही नाटक बघीतल्या वरच त्यांना रंगभूमी वरचा  पहिला आंणि शेवटचा सुपरस्टार का म्हणतात हे कळते.

चित्रपटातील मला भावलेले पात्र .

(आणि हो सुबोध तुझ्या ब्द्द्ल शेवटी😊 )

प्रसाद ओक (पणशीकर)- मित्र असावा तर असा .

इरावती घाणेकर (नंदीता पाटकर)- माझे पती सौभाग्यवती मधली तु आठवली आणि या चित्रपटातून परत एकदा तशीच शांत स्वभावाची आणि अतोनात सहनशीलता असणारी दिसली.👍
कांचन घाणेकर (वैदेही परशुरामी)-काय दिसलिस तु👌👌👌 आणी डॉ.कशिनाथ  घाणेकर आल्यावर दार उघडते आणि ति दोघांची नजर अहाहहा .यकदम "मारडाला" आणी "घाणेकर काका"🤔😆

सूमित राघवन (श्रीराम लागू), -लाल झब्यातला तुझा तो तजेलदार चेहरा काही क्षण हुबेहुब डॉ लागू च डोळ्यासमोर आले.

सोनाली कुलकर्णी (सुलोचना), - तुझी आवाजाची जादू नेहमीच मनाला भुरळ घालते. (चित्रपटातील साडया ऐक पेक्षा ऐक सुंदर आहेत.🤗😊)

भालजी पेंढारकर (मोहन जोशी)- नातीचे अचुक मन ओळखणारे.   

वसंत कानेटकर (आनंद इंगळे) -भारदस्त आवाज,चित्रपटात इन्ट्री होताच मराठी भाषेवरच प्रेम दिसते.

 आणि
 डॉ.काशिनाथ घाणेकर (सुबोध) - तुला यासाठी किती मेहनत घ्यावी लागली असेल हे सपुर्ण चित्रपटातून दिसते . 

मी एकटीने (नवरा बाजुला बसलेला असताना 😜 ) थिऐटर मध्ये सुबोध तुझ्या इन्ट्री ला टाळ्या वाजवल्या.खरच खुप सुंदर प्रभावी अभिनय केला आहे.  (माझा नऊ वर्षाचा मुलगा घरात पण प्रत्येक वाक्याच्या शेवटी "एकदम कडsssक"  हा शब्द बोलतो आता .😍☺)

 ‘उसमें क्या है..’ हे शब्द म्हणत त्या काळी  डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी  आणि आता लाहण्यानपासुन मोठ्यांन पर्यंत सुबोध ने सगळयांवर जादू केली आहे. एकदम कडsssक

चित्रपट का बघावा- 1. सुबोध साठी  2.डॉ.काशिनाथ घाणेकर ही व्यक्ती माहिती होण्या साठी.

😊🤗🙏🏻🎊🎉💐

Tuesday 26 June 2018

'' सातही जन्म आपण दोघे सोबतच राहू''


  प्रत्येक सणाला स्त्रियांची भूमिका नेहमीच अधोरेखित होत असते. सगळ्याच सणाला आपला भक्तिभाव, आपुलकीची भावना नेहमी अव्वल ठरते कारण त्यातल्या प्रत्येक गोष्टी आपण खुप निर्मळ मनाने करतो.
      हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
      मी मात्र  वट सावित्रीची पूजा करत नाही . उपवास करते (अगदी डाएट म्हणुन ). बाजारातुन कुठुन तरी तोडून / चोरुन  आणलेली ती वडाची फांदी आपण विकत घेऊन त्या वडाच्या फ़ांदीची पुजा करून पुण्य तर नाहीच मिळणार.  पण त्या झाडाचे शाप नक्कीच लाभतील. आणि वडाच्या झाडा  जवळ जाऊन पूजा करताणा  आपण वाहिलेले ओटी , फळ हे तेथील लोक घेऊन जातात. हे काही माझ्या मनाला पटत नाही . त्या पेक्ष्या एखाद्या गरीब लोकांना काही दान (अन्न  ,फळ )  केले  तर नकीच आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतील .
   पुराणामध्ये घडलेल्या एका घटनेमुळे आजचा वटसावित्री पुजनाचा उत्सव सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले आणी तेव्हापासुन ही सावित्री आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठीदेवाकडे प्रार्थना करते जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी देवाला साकडे तो एक श्रध्देचा भाग आहे.
    चला आता आधुनिक सावित्री कडे येउयात ...आजच्या काळी स्त्री व पुरुष दोघेही कमावतात व स्वताचा संसार चालवतात. आज स्री ही पुरुषाच्या बरोबरीने काम करते. प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. पण बदलत्या काळा नुसार नवरा बायकोच्या नात्यात बदल होत  आहे.  नवरा बायकोने एकमेंकांची काळजी घेतात  , सुख दुःख वाटून घेतात , संसारात कितीही अडचणी आल्या काही वाद झाले तरीही ते शांत पनाने दोघ सोडवतात , यासारखा दोघांनी समजुदार पणा दाखवल्यास नात्याची वीण अजून घट्ट होऊन '' ‘सातही जन्म हाच पती मिळो’अशी कमान न करता , सातही जन्म आपण दोघे सोबतच राहू'' अशी दीर्घायुष्यासाठीची कामना असेल.
       थोडे  निसर्ग कडे जाऊया  पावसाळ्याची चाहूल लागली की येणारा हा पहिलाच सण असतो.
     कायमची  दुष्काळजन्य परिस्थिती बदल्याणासाठी  व पर्यावरणाचे जतन व संरक्षण करून निसर्गचक्र नियमित करण्यासाठी  वटपौर्णिमा अशा वेगवेगळ्या  सण, उत्सवाच्या माध्यमातून वृक्षारोपण करू या . चला, तर मगमैत्रिणींनो या वटपौर्णिमेला नक्कीच एखादे झाड लावून  निसर्गाच संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निश्चय करु या. 

(वरील लेखात मी माझे विचार मांडलेले आहे.  पण कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही .)

सीमा लिंगायत  कुलकर्णी
पुणे

Friday 18 May 2018

प्रेम स्वरूप आई


ऑडिओ पत्र ऐकलय कधी ?
नाही ना, तर मग ऐका ,
मातृदिना  निमित्त  प्रेम स्वरूप आई विषयी मनीषा मुळे यांनी व्यक्त  केलेल्या भावना ऑडिओ पत्रातून 

मनिषा  मुळे 
औरंगाबाद  

Sunday 13 May 2018

प्रिय आई

आई आणी मी👭💐😊




प्रिय आई,
ये आई तुला पत्र लिहण्याचा  कधी  प्रसंग आलाच नाही.
पण आज आहे. म्हणून मनाशी ठरवले होते, कि यावेळी मातृदिनाच्या शुभेच्छा पत्रातून द्यायच्या आईमुलाचंनातं म्हणजेविश्वलग्न होऊन सासरी आले पण सगळं अगदी तुझ्या सारखं निटनिटके आणि नवीन काही तरी  करण्याचा सारखा प्रयत्न करत असते .  स्वयंपाक मात्र तुझ्या सारखा चविष्ट करण्याचा अजूनही खूप प्रयत्न करते पण कधी जमतो कधी नाही . पण कधी पाहुणे आल्यावर त्यांनी स्वयंपाकाचे कौतुक केले कि तुमचे जावई लगेच म्हणतात आहेतच आमच्या सासूबाई सुगरण त्यांच्या हाताखाली ट्रेन झाली आहे बायको आमची . हे ऐकून खूप भारी वाटते.
तू नेहमी म्हणायची मुलीने कितीही उच्च शिक्षण घेतले तरी .प्रत्येकाला आनंदी  ठेवायचे असल्यास त्याचा मार्ग पोटातून जात असतो. आई हि मैत्रीण कधी झाली ते कळेच नाही. काळानुसार स्वतःला आणि आम्हालाही जगायला शिकवले. खरंच आई, मी आज स्वतः आई झाल्यावर मला कळतंय आई बनणं इतकं सोपं नाही. अशीच माझ्या पाठीशी सदैव राहा.....!

आणि हो, नेहमी मी येते माहेर पणाला यावेळी तू ये माझ्याकडे माहेर पणाला. मला अजून खूप गप्पा मारायच्या आहेत.

कळावे ,
तुझीच सीमा

Tuesday 10 April 2018

सोळाव वरीस आनंदाच........



सोळाव वरीस धोक्याचं न म्हणता आनंदाच उत्साहाचं करण्यासाठी ऐका  मनीषा मुळे यांनी सांगितलेला कानमंत्र . 

मनिषा  मुळे 
औरंगाबाद  

Sunday 8 April 2018

१२ वे वर्ष धोक्याचे

१६ वे  वर्ष धोक्याची असं म्हणतात खरे पण आजकाल तर ते १२ वे वर्ष वरच आलेले दिसते 
आजकाल घरातील आणि बाहेरील वातावरण असे झाले आहे कि मुलांना समाज हि फारच लवकर येत आहे . 
आधी वर्षाने माणसाची वाढ होत असे आजकाल ते दिवसावर आलेले दिसते  आधी जन्माला आलेले मूल हे सात आठ दिवस हाताची मूठ उघडत नव्हते आजकाल तर जगात आल्या आल्या हात पाय हलवू लागतात . 
खरंच आयुष्य कमी झाल्यासारखेच वाटायाला लागले आहे, एवढे पटापट मुले मोठी होतात ना कि 
वेळ केव्हा निघून जातो कळत सुद्धा नाही. वयात आल्यावर तर विचारूच नको कसे अगदी फार मोठे झाल्यासारखे वागू लागतात मला तरी वाटतं १६व वरीस धोकयाच म्हणण्यापेक्षा १२व वरीस धोक्याचं म्हणता येईल आता, या वयात मुलाच्या प्रश्नांची उत्तरे देणे खूप अवघडल्यासारखे होऊन जाते. स्पष्ट त्यांना विचारता हि येत नाही आणि व्यक्त हि होता येत नाही आणि  T.V , शाळेतील वातावरण याचा हमखास परिणाम मुलांच्या डोक्यावर होत असतो आणि ते वाट चुकू नये म्हणून खबरदारी घेणे हि पालकांची जबाबदारी असते त्यामुळं घरात सुसंवाद ठेवणे , मुलांनी आपल्याजवळ  व्यक्त होणे त्यांना पुरेसा वेळ देणे त्यांचं म्हणणं शांतपणे  ऐकून घेणे , योग्य त्या वयात योग्य  त्या गोष्टी समजावणे हे हि आपले महत्वाचे कर्तव्य  आहे.  

Monday 2 April 2018

आजीला बघुन सगळे 😲


आजीला अचानक बघून मोठ्यांची झालेली तारांबळ आणि नंतर केलेली धमाल . 
ऐका  तर मग एप्रिल फुल या विषयी  मनिषा  मुळे यांची ऑडिओ क्लिप .

मनिषा  मुळे 
औरंगाबाद  

Sunday 25 March 2018

कचरा वर्गीकरण - एक पाऊल स्वच्छतेकडे


औरंगाबादच्या  कचरा कोंडीची बातमी पाहून माझ्या मनात विचार आला, फक्त औरंगाबादच नाही तर बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न पुढे मागे निर्माण होऊ शकतो. याला कळत नकळत आपण सारेच जबाबदार आहोत का? तर याचे उत्तर नक्कीच हो येईल बरोबर ना. आपल्या सगळ्याना सुखी जीवन हवे असेल तर चला कचरा वर्गीकरण करून, एक पाऊल स्वच्छतेकडे टाकू आणि स्वच्छ औरंगाबाद करूयात.

आपण सगळे कमीतकमी कष्ट करून जास्तीत जास्त सुखात राहायचा प्रयत्न करतोय. वापरा आणि फेका ही प्रवृत्ती आपल्या सगळ्यामध्ये निर्माण होत चालली आहे. त्याकडे किमान आता तरी गंभीर प्रश्न म्हणून पाहिले पाहिजे. 


युज अँड थ्रो- प्लास्टिक कचरा

आपल्या घरात छोटासा कार्यक्रम असला की आपण लगेच यूज अँड थ्रो चे ग्लास, चमचे, द्रोण, प्लेट आणतो , वापरतो आणि देतो. घरात शोकेस मध्ये मारे ऐटीत ग्लास, डिनर सेट ठेवलेले असतात, पण ते वापरले तर परत धुणार कोण? म्हणून आपण ते फक्त शोकेसची शोभा वाढवण्यासाठीच ठेवतो, धुवायला वेळ कोणाला आहे? सांगा बरं.


बिस्लरी बाटल्या

 पूर्वी गावाला जाताना आपण मोठ्या वॉटर बॅग्ज न्यायचो.पण आता ठिकठिकाणी बिस्लरीच्या बाटल्या घेतो, दिसेल त्या जागी वापरून फेकून देतो.

नॅपकिन्स

लहान मुलांचे लंगोट हा प्रकार तर आपण विसरूनच गेलोय. हगीज,सॅनिटरी नॅपकिन्स ! सरासपणे वापले जाते.  हात पुसायला रुमाल ऐवजी पेपर नॅपकिन्स! बापरे! वापरा आणि फेका असा किती कचरा टाकतो आपण !


 पॉलिथीन पिशव्या   

 पूर्वी वाण सामान आणताना घरातूनच तेलाची बरणी, तुपासाठी डबा न्यावा लागायचा. आता यासाठी विविध प्रकारच्या पॉलिथीन पिशव्या किंवा बाटल्या मिळतात, नंतर त्या आपण फेकून देतो.




स्वतंत्र पिशवीचा हट्ट 

पूर्वी लग्नाचा कितीही मोठा बस्ता बांधला तरी तो एकाच मोठ्या कापडात  गाठोडं करून मिळायचा. आता प्रत्येक साडीसाठी व कपड्यासाठी स्वतंत्र पिशवीच आपला अट्टाहास असतो.






वापरा आणि फेका वृत्ती


वस्तू दुरुस्तीकडे आपला कल नसतो. बूट, चप्पल, खेळणी, छत्री अशा गोष्टी आपण लगेच फेकून नव्या घेतो. त्या वस्तूचा दुरुस्त करून पुन्हा वापर करणे ही  संकल्पना आपल्याला रुचत नाही त्यामुळे अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. याला जबाबदार कोण? याचे उत्तर म्हणजे सध्याचे धावते युग म्हणावे लागेल. कोणालाही विचार करायला वेळ नाही. रात्र थोडी सोंगे फार. प्रत्येक जण आपापल्या कोशात आणि व्यापात इतका अडकलाय की त्याला स्वतःच्या आयुष्याची कोंडी फोडायला वेळ नाही तर कचरा कोंडीचं काय घेऊन बसलात ?


पार्सल            

कंटाळा आला की आपण पटकन एखाद्या हॉटेलमधून जाऊन जेवण ऑर्डर करतो, पण हे पार्सल फोडल्यानंतर होणाऱ्या कचऱ्याने एक अक्खी कॅरी बॅग भरते, पण आपण मात्र वेगळ्याच आनंदात असतो.

इलेक्ट्रॉनिक वस्तू

आपल्या दैनंदिन जीवनात आपण लाईट, फॅन आणि इतर अनेक वस्तूचा वापर करतो, पण ह्या वस्तू खराब झाल्या की आपण बिनधास्त कचऱ्यात टाकतो. त्या टाकताना लाईटच्या काचा फुटतात. त्यापासून इजा होऊ शकते.

मित्र मैत्रिणीनो आता कचरा गोळा करताना त्याचे वर्गीकरण करा. म्हणजे ओला सुका आणि इतर वस्तू आदींचे. यामुळे आपले आणि आपल्या आप्तस्वकीयांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत मिळेल.



प्रतीक्षा परिचारक-पाठक
औरंगाबाद

Saturday 24 March 2018

कचरा हा वैयक्तिक प्रश्न ?


आपण कचरा आणि केरसुणी ला लक्ष्मी मानणारे  माणसं . मग या पुढे कचरा कधीच बाहेर फेकायचा नाही. ऐका  तर मग कचरा या विषयी  मनिषा  मुळे यांची ऑडिओ क्लिप .

मनिषा  मुळे 
औरंगाबाद  

डोळ्यात येईल पाणी.....!

शहरातल्या कचऱ्याची फुटेना कोंडी,.........
अन सकाळी सकाळी बायको,
लागली माझ्या तोंडी,......
डब्याच्यापिशवीला हात केला पुढे
तर म्हणे,
कचऱ्याच्या पिशव्यानंचे 
सोडवा आता तिढे,.....
साचलेल्या कचऱ्याचा सुटतोय वास,....
लहान काय मोठं काय सगळ्यांनाच त्रास...
रस्त्यावरचे ढिगारे पाहून
मुलं विचारतात प्रश्न,...
कसं असत ग 
ह्या माऊंनटेनच तयार होणं?
सडतोय, कुजतोय.....
आजारही पसरवतोय ,....
माणसानेच निर्माण केलेला कचरा
माणसालाच रडवतोय,....
युज अँड थ्रोच्या जमान्यात
एक मात्र दिसून आलं,....
इन्स्टंटच्या वेडान,
प्रदूषणाला आमंत्रण गेलं,..
आता तरी माणस,
व्हावी जरा शहाणी,...
कमी कचरा करण्याचं,
वचन घ्यावं सर्वांनी,....
आणि पाहून परिस्थिती औरंगाबादची,...
कृपा करावी निसर्गानी,...
उन्हाळाच चालू द्यावा,...
पडू नाही पावसानी,..
नाहीतर मग साऱ्यांच्या,...
डोळ्यात येईल पाणी,.....
             💐स्वप्ना

" कचराच कचरा सगळीकडे ग बाई ,गेला माणूस कुणीकडे"

 " कचराच कचरा सगळीकडे ग बाई ,गेला माणूस कुणीकडे"  आज रस्त्यावर ,जिकडे तिकडे इतस्ततः 
आपणास कचऱ्याचे ढिगारे पडलेले दिसतात ,पण कधी विचार केला का कि या परिस्थितीला जबाबदार कोण ? 
खरं तर माणसाने निर्माण केलेली स्थिती स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेली आहे .
         घर स्वच्छ , नीटनेटके असण्याकडे आपला पूर्ण कटाक्ष असतो .घर साफ करण्याच्या नादात घरातील घाण 
आपण रस्त्यावर फेकतो .कचरा कुंडीत , प्रशासनाने नेमून दिलेल्या जागेवर कचरा टाकला तर कोणालाच अडचण होणार नाही. 
 परंतु नियम  पाळले तर मानव जात कशी  जरा अतिरेक वाटत असेल पण स्वतःच अवलोकन करा किया जगात नियमांनी 
चालणाऱ्या लोकांची संख्या किती आणि नियम न पाळणारे किती लोकसंख्या आहेत ?
     'कचरा ' हा विषय इतका गहन आहे कि त्यावर नुसती चर्चा करून प्रश्न सुटणार नाही . 
कचऱ्याचे निर्माते आपण सर्वे सर्व असल्याने यावर उपाय शोधणे ,व्यवस्थापन करणे आणि अंमलबजावणी करणे 
हि आपलीच जबाबदारी आहे काचऱ्या सारखी गोष्ट किती महत्वाची आहे हे साठून राहिल्याशिवाय कळत नाही रस्त्याने 
जाताना कचऱ्याची गाडी बाजूनी जाऊ लागली तर त्याच्या दुर्गंधीने आपण नाक बंद करतो .जी घाण आपणच निर्माण केली आहे. 
 ती जर आपल्याला सहन होत नसेल तर इतरांनी त्याचा त्रास का सहन करायचा?
     विदेशात फिरून आलेली व्यक्ती तेथील स्वच्छतेची गोडवे गाताना दिसतात. पण विरोधाभास असा आहे कि त्यांना येथील स्वच्छतेचे भान नसते. 
हे म्हणजे असे कि "लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण". आपल्या देशात कोणाचा कोणाला धाक नाही, कोणी कोणाला भीत नाही,
 या बाबतीत घडलेली एक सत्य घटना :
विदेशातून भारतात शिफ्ट होताना एका व्यक्तीने घरातील सर्व प्रकारचा कचरा एकत्र केला आणि कचरा कुंडीत टाकला. 
एअरपोर्टवॉर पोहोचताच त्याला तिथल्या ऑथॉरिटी कडून फोने आला कि कचरा एकत्र टाकल्या बद्दल त्याला दंड आकारण्यात आला आहे.
 हीच घटना भारतात झाली असती तर त्यावर कोणतीच कारवाई केल्या गेली नसती. याचे कारण सर्वानी शोधून काढावे.
कचरा करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, त्याचे वर्गीकरण करणे हि आपल्या प्रत्येकाची "नैतिक" जबाबदारी आहे.  

प्रत्यक्षात घडलेली दुसरी घटना:

रस्त्यावरून चालू कार मधून एका व्यक्तीने रॅपर बाहेर फेकले. हे प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार ने बघितले. ताबडतोब त्याने ती गाडी थांबवली. खुद्द अक्षय कुमार ला समोर पाहून त्या व्यक्तीस खूप आनंद झाला. काही क्षणातच अक्षय कुमार ने ते रॅपर उचलून त्या फेकणाऱ्या व्यक्तीच्या गाडीत टाकले. 

     रस्त्यावर, इतरत्र, कोठेही कचरा टाकू नये त्याचे हे बोलके उदाहरण आहे. 

      एक विनोदाचा भाग म्हणणं पहिला तर एका मुलीला तिची आई कचरा देते व 'माणूस बघून कचरा ताक' असे सांगते.
 किती वेळ झाला तरी मुलीला गॅलरी मध्ये बघून ती कारण विचारते तेव्हा मुलगी म्हणते कि 'अगं आई अजून एक पण माणूस नाही आला. '
 म्हणजे कचरा घरातून, गल्लेरीतून, गच्चीतून, कुठूनही फेकतो.

      शहरातील कचऱ्याचे ढिगारे वाढण्याचे मूळ कारण आपण स्वतःच आहोत.  साठलेल्या ढिगांमुळे रोगराई पसरते, प्रत्येकाचे आरोग्य धोक्यात येते. निरुपद्रवी प्राण्यांचा सुळसुळाट होतो. हि परिस्थिती काबूत आणण्यासाठी पुढील प्रमाणे काही उपाययोजना करता येतील :
१. कचरा योग्य ठिकाणीच टाकावा
२. कचऱ्याचे वर्गीकरण करावे
३. पुनर्वापर करता येणाऱ्या कचऱ्याचा योग्य उपयोग करावा

    अशी साधीच पण महत्वाची निर्बंध स्वतःवर लादून घेतली तर कचऱ्याची समस्या कमी होण्यास पुष्कळ मदत होईल. प्रत्येक वेळेस शासनाचं जबाबदार असते असे नव्हे तर बऱ्याच अंशी चुका करणारे आपणही आहोत. सध्या कचऱ्याचे ढिगारे आहेत परंतु हि परिस्थिती जर अशीच वाढत गेली तर कचऱ्याचे डोंगर होण्यास वेळ लागणार नाही. म्हणूनच नियमांचे पालन करावे, कचऱ्याच्या व्यवस्थापनात हातभार लावावा आणि सामाजिक स्वच्छता राखावी.

"मी बाई कचरा किती माझे हाल हाल
सर्वाना वाटते स्वतः राहावे खुशहाल'
ओल्यात सुका मिसळताना माझे होतात बेहाल
स्वच्छता झाली म्हणून सारे आहेत mastawal
शिक्षा म्हणून आकार यांच्यावर दंड
मग मात्र लगेच पुकारत बंद
मोर्चे काढणार, भाषण ठोकणार कचरा निर्मूलनासाठी
स्वतः मात्र कोरडे पाषाण परिसरातील स्वच्छतेसाठी
सार्यांनी एकत्र येऊन गरज आहे विचार करण्याची 
कचरा निर्मूलनाचा प्रश्न मार्गी लावण्याची... 

--सौ. शिवांगी विजय कुलकर्णी
संभाजीनगर 

Flying Jatt



"कचरा" हा विषय खरंच खूप गंभीर आहे, त्याची सुरुवात प्रथम आपल्यापासूनच व्हायला पाहिजे. 
तसेही प्रशासन कचरा निर्मूलनासाठी बरीच माहिती प्रसारित करत राहते. एक नागरिक म्हणून तरी आपण हा प्रश्न 
नीट हाताळला पाहिजेच. आपण ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करून दिला पाहिजे जेणे करून 
पुढील कचरा प्रवास smoothly होईल आणि कर्मचाऱ्यांना सुध्दा त्याचे वर्गीकरण करणे सोपे होईल. 
बराच अशा काही गोष्टी असतात ज्या आपण reuse सुध्दा करू शकतो किंवा टाकाऊ पासून टिकावू वस्तू पण बनवू शकतो. 
बऱ्याच प्लास्टिक  bottols आपण तश्याच फेकून देतो , कॅरीबॅग मध्ये कचरा भरून फेकतो , 
जे नैसर्गिक विघटन होणारे  कचरा आहे त्या पासून आपण खत बनवू शकतो, ते आपल्या कुंड्यामध्ये वापरू शकतो, 
विविध उपयोगी वस्तू आपण थोडे विचार केले तर तयार करू शकतो. आजकाल खूप मोठ्या प्रमाणात e -कचरा जमा होत आहे. 
 यात मोबाइल, कम्पुटर ,वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक साहित्य बाद झाले कि ते आपण टाकून देतो, हे सगळे 
पर्यावणाला खूप हानिकारक आहेत आणि त्यांचे रीसायकलिंग पण खूप हानिकारक आहे त्यात तयार होणारे धूर हे 
पर्यावरण तसेच आरोग्यासाठी हि हानिकारक आहेत. 
Flying Jatt मूवी आठवली कि अंगावर काटाच येतो खरंच आपणच आपल्या  विनाशाला कारणीभूत ठरू असे दिसते. 

तुमचीच सखी 
"माझे पान"