मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Saturday 24 March 2018

" कचराच कचरा सगळीकडे ग बाई ,गेला माणूस कुणीकडे"

 " कचराच कचरा सगळीकडे ग बाई ,गेला माणूस कुणीकडे"  आज रस्त्यावर ,जिकडे तिकडे इतस्ततः 
आपणास कचऱ्याचे ढिगारे पडलेले दिसतात ,पण कधी विचार केला का कि या परिस्थितीला जबाबदार कोण ? 
खरं तर माणसाने निर्माण केलेली स्थिती स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेली आहे .
         घर स्वच्छ , नीटनेटके असण्याकडे आपला पूर्ण कटाक्ष असतो .घर साफ करण्याच्या नादात घरातील घाण 
आपण रस्त्यावर फेकतो .कचरा कुंडीत , प्रशासनाने नेमून दिलेल्या जागेवर कचरा टाकला तर कोणालाच अडचण होणार नाही. 
 परंतु नियम  पाळले तर मानव जात कशी  जरा अतिरेक वाटत असेल पण स्वतःच अवलोकन करा किया जगात नियमांनी 
चालणाऱ्या लोकांची संख्या किती आणि नियम न पाळणारे किती लोकसंख्या आहेत ?
     'कचरा ' हा विषय इतका गहन आहे कि त्यावर नुसती चर्चा करून प्रश्न सुटणार नाही . 
कचऱ्याचे निर्माते आपण सर्वे सर्व असल्याने यावर उपाय शोधणे ,व्यवस्थापन करणे आणि अंमलबजावणी करणे 
हि आपलीच जबाबदारी आहे काचऱ्या सारखी गोष्ट किती महत्वाची आहे हे साठून राहिल्याशिवाय कळत नाही रस्त्याने 
जाताना कचऱ्याची गाडी बाजूनी जाऊ लागली तर त्याच्या दुर्गंधीने आपण नाक बंद करतो .जी घाण आपणच निर्माण केली आहे. 
 ती जर आपल्याला सहन होत नसेल तर इतरांनी त्याचा त्रास का सहन करायचा?
     विदेशात फिरून आलेली व्यक्ती तेथील स्वच्छतेची गोडवे गाताना दिसतात. पण विरोधाभास असा आहे कि त्यांना येथील स्वच्छतेचे भान नसते. 
हे म्हणजे असे कि "लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण". आपल्या देशात कोणाचा कोणाला धाक नाही, कोणी कोणाला भीत नाही,
 या बाबतीत घडलेली एक सत्य घटना :
विदेशातून भारतात शिफ्ट होताना एका व्यक्तीने घरातील सर्व प्रकारचा कचरा एकत्र केला आणि कचरा कुंडीत टाकला. 
एअरपोर्टवॉर पोहोचताच त्याला तिथल्या ऑथॉरिटी कडून फोने आला कि कचरा एकत्र टाकल्या बद्दल त्याला दंड आकारण्यात आला आहे.
 हीच घटना भारतात झाली असती तर त्यावर कोणतीच कारवाई केल्या गेली नसती. याचे कारण सर्वानी शोधून काढावे.
कचरा करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, त्याचे वर्गीकरण करणे हि आपल्या प्रत्येकाची "नैतिक" जबाबदारी आहे.  

प्रत्यक्षात घडलेली दुसरी घटना:

रस्त्यावरून चालू कार मधून एका व्यक्तीने रॅपर बाहेर फेकले. हे प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार ने बघितले. ताबडतोब त्याने ती गाडी थांबवली. खुद्द अक्षय कुमार ला समोर पाहून त्या व्यक्तीस खूप आनंद झाला. काही क्षणातच अक्षय कुमार ने ते रॅपर उचलून त्या फेकणाऱ्या व्यक्तीच्या गाडीत टाकले. 

     रस्त्यावर, इतरत्र, कोठेही कचरा टाकू नये त्याचे हे बोलके उदाहरण आहे. 

      एक विनोदाचा भाग म्हणणं पहिला तर एका मुलीला तिची आई कचरा देते व 'माणूस बघून कचरा ताक' असे सांगते.
 किती वेळ झाला तरी मुलीला गॅलरी मध्ये बघून ती कारण विचारते तेव्हा मुलगी म्हणते कि 'अगं आई अजून एक पण माणूस नाही आला. '
 म्हणजे कचरा घरातून, गल्लेरीतून, गच्चीतून, कुठूनही फेकतो.

      शहरातील कचऱ्याचे ढिगारे वाढण्याचे मूळ कारण आपण स्वतःच आहोत.  साठलेल्या ढिगांमुळे रोगराई पसरते, प्रत्येकाचे आरोग्य धोक्यात येते. निरुपद्रवी प्राण्यांचा सुळसुळाट होतो. हि परिस्थिती काबूत आणण्यासाठी पुढील प्रमाणे काही उपाययोजना करता येतील :
१. कचरा योग्य ठिकाणीच टाकावा
२. कचऱ्याचे वर्गीकरण करावे
३. पुनर्वापर करता येणाऱ्या कचऱ्याचा योग्य उपयोग करावा

    अशी साधीच पण महत्वाची निर्बंध स्वतःवर लादून घेतली तर कचऱ्याची समस्या कमी होण्यास पुष्कळ मदत होईल. प्रत्येक वेळेस शासनाचं जबाबदार असते असे नव्हे तर बऱ्याच अंशी चुका करणारे आपणही आहोत. सध्या कचऱ्याचे ढिगारे आहेत परंतु हि परिस्थिती जर अशीच वाढत गेली तर कचऱ्याचे डोंगर होण्यास वेळ लागणार नाही. म्हणूनच नियमांचे पालन करावे, कचऱ्याच्या व्यवस्थापनात हातभार लावावा आणि सामाजिक स्वच्छता राखावी.

"मी बाई कचरा किती माझे हाल हाल
सर्वाना वाटते स्वतः राहावे खुशहाल'
ओल्यात सुका मिसळताना माझे होतात बेहाल
स्वच्छता झाली म्हणून सारे आहेत mastawal
शिक्षा म्हणून आकार यांच्यावर दंड
मग मात्र लगेच पुकारत बंद
मोर्चे काढणार, भाषण ठोकणार कचरा निर्मूलनासाठी
स्वतः मात्र कोरडे पाषाण परिसरातील स्वच्छतेसाठी
सार्यांनी एकत्र येऊन गरज आहे विचार करण्याची 
कचरा निर्मूलनाचा प्रश्न मार्गी लावण्याची... 

--सौ. शिवांगी विजय कुलकर्णी
संभाजीनगर 

1 comment:

Anonymous said...

ekdum barobar