मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Tuesday 26 June 2018

'' सातही जन्म आपण दोघे सोबतच राहू''


  प्रत्येक सणाला स्त्रियांची भूमिका नेहमीच अधोरेखित होत असते. सगळ्याच सणाला आपला भक्तिभाव, आपुलकीची भावना नेहमी अव्वल ठरते कारण त्यातल्या प्रत्येक गोष्टी आपण खुप निर्मळ मनाने करतो.
      हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
      मी मात्र  वट सावित्रीची पूजा करत नाही . उपवास करते (अगदी डाएट म्हणुन ). बाजारातुन कुठुन तरी तोडून / चोरुन  आणलेली ती वडाची फांदी आपण विकत घेऊन त्या वडाच्या फ़ांदीची पुजा करून पुण्य तर नाहीच मिळणार.  पण त्या झाडाचे शाप नक्कीच लाभतील. आणि वडाच्या झाडा  जवळ जाऊन पूजा करताणा  आपण वाहिलेले ओटी , फळ हे तेथील लोक घेऊन जातात. हे काही माझ्या मनाला पटत नाही . त्या पेक्ष्या एखाद्या गरीब लोकांना काही दान (अन्न  ,फळ )  केले  तर नकीच आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतील .
   पुराणामध्ये घडलेल्या एका घटनेमुळे आजचा वटसावित्री पुजनाचा उत्सव सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले आणी तेव्हापासुन ही सावित्री आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठीदेवाकडे प्रार्थना करते जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी देवाला साकडे तो एक श्रध्देचा भाग आहे.
    चला आता आधुनिक सावित्री कडे येउयात ...आजच्या काळी स्त्री व पुरुष दोघेही कमावतात व स्वताचा संसार चालवतात. आज स्री ही पुरुषाच्या बरोबरीने काम करते. प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. पण बदलत्या काळा नुसार नवरा बायकोच्या नात्यात बदल होत  आहे.  नवरा बायकोने एकमेंकांची काळजी घेतात  , सुख दुःख वाटून घेतात , संसारात कितीही अडचणी आल्या काही वाद झाले तरीही ते शांत पनाने दोघ सोडवतात , यासारखा दोघांनी समजुदार पणा दाखवल्यास नात्याची वीण अजून घट्ट होऊन '' ‘सातही जन्म हाच पती मिळो’अशी कमान न करता , सातही जन्म आपण दोघे सोबतच राहू'' अशी दीर्घायुष्यासाठीची कामना असेल.
       थोडे  निसर्ग कडे जाऊया  पावसाळ्याची चाहूल लागली की येणारा हा पहिलाच सण असतो.
     कायमची  दुष्काळजन्य परिस्थिती बदल्याणासाठी  व पर्यावरणाचे जतन व संरक्षण करून निसर्गचक्र नियमित करण्यासाठी  वटपौर्णिमा अशा वेगवेगळ्या  सण, उत्सवाच्या माध्यमातून वृक्षारोपण करू या . चला, तर मगमैत्रिणींनो या वटपौर्णिमेला नक्कीच एखादे झाड लावून  निसर्गाच संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निश्चय करु या. 

(वरील लेखात मी माझे विचार मांडलेले आहे.  पण कुणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही .)

सीमा लिंगायत  कुलकर्णी
पुणे

No comments: