मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Friday 23 February 2018

बदल हा निसर्गाचा नियम आहे.

स्वयंपाकघर हे नुसते नाव जरी तोंडावर आले तरी तेथील विविध प्रकारच्या चवी जिभेवर रेंगाळतात. मन एकदम प्रसन्न होते. स्वयंपाक घरावर पूर्ण ताबा घरातील स्त्रीचा असतो. मग ती ग्रहिणी असो किंवा नोकरदार ,,, प्रत्येक वस्तूवरून मायेने तिचा हात फिरतो. तिच्या सर्व कृतीतून कोणत्या ना कोणत्या वस्तु हाताळल्या जातात.
   सध्याचे स्वयंपाकघर हे पूर्वीचे माजघर म्हणून ओळखले जायचे. या माजघरामध्ये घरातील स्त्रीचा अधिकाधिक वेळ जात होता.सकाळी उठल्यापासून अगदी दळणकांडण तिची सुरुवात होत असे. पण या कामात गाणी म्हणजेच ओव्या गात गात ती दळण दळत असे. परिणामी मन रमत आणि कामाचा थकवा पण जाणवत नव्हता.अन्न शिजवण्यासाठी चुलीचा उपयोग केला जात होता. त्यावर शिजवलेले अन्न रुचकर आणि स्वादिष्ट लागत असे. फुंकणीने विस्तव तयार करून जो धूर घरात पसरे त्याला  वेगळा सुगंध असे. चुलीवरची भाकरी, पिठले आणि ठेचा ही सारी अमृत तुल्य वाटे .
लोणचे,तक्कू, विविध प्रकारच्या चटण्या यांनी एक कोपरा व्यापलेला असे. माळ्यावर लपवून काही गोष्टी ठेवल्या जात.माऊलीने तूप काढवण्यास काढले की त्याचा सुवास घरभर पसरायचा.इतकी सारी कामे असली तरी सदैव आनंदी आणि प्रसन्न अशी तिची प्रतिमा होती.मुळात माजघरातील सर्व वस्तूंचा ति पुरेपूर उपभोग घेत असे.
      सध्या सर्व परिस्थिति बदलली आहे. माजघराला फक्त स्वयंपाक घराचे स्वरूप आले आहे. ऐसपैस असलेले माजघर आता छोटेसे किचन बनले. जागे अभावी कामापुरत्या वस्तूंनी जागा घेतल्या. जात्या ऐवजी मिक्सर आले. स्विच ऑन केले की दोन मिनिटात पीठ तयार. चुलीला गॅसचा पर्याय आला. खूप कमी वेळेत अन्न शिजू लागले. प्रेशर कुकर ची शिट्टी झाली की वरण भात तयार पाहिजे तेव्हा, पाहिजे त्या चटण्या आणि लोणचे उपलब्ध झाल्याने स्त्रीचा वेळ वाचतोय .
     बदल हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक परिस्थितीत गतीमानता असणे आवश्यक आहे.तर आणि तरच सुधारणा होण्यास मदत होते.म्हणूनच पूर्वीचे जाते,खलबत्ता,उखळ आणि चूल या सार्‍यांची जागा सुधारित वस्तूंनी म्हणजेच बदलत्या स्वरुपात घेतल्या आहेत. या बद्लामुळे वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होऊ लागली. मिळालेला रिकामा वेळ स्त्रीला आपल्या स्वतःसाठी देता येऊ लागला.वस्तु आधीच्याच पण बदलत्या स्वरुपामुळे घरातील स्त्रीमधे प्रगति होत गेली.फक्त चूल आणि मूल एवढीच संकल्पना आजच्या स्त्रीची राहिली नसून घरातील सर्व जबाबदारी सांभाळून इतर जोखमीची कामे करणार्‍या महिला दिसतात याचे एकमेव कारण माजघरातील वस्तूंचे बदलते स्वरूप होय.
 आजच्या स्थितीत फक्त चूल आणि मूल एवढीच संकल्पना आजच्या स्त्रीची राहिलेली नसून पुढारीत आणि शिक्षित घडली आहे. वस्तूंच्या बदलत्या स्वरूपाने हे सहज शक्य झाले आहे.

शिवांगी विजय कुलकर्णी
    संभाजीनगर                                                    


माजघर हे तीचं साम्राज्य


अपर्णा मानोलीकर ( जहागिरदार )
परभणी 

जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती जगाला उद्धारी।।


 खणखणीत अशा आवाजात मनिषा  मुळे यांची  '' जन्मताच मुली असुरक्षित का?'' यावर अप्रतिम अशी ऑडिओ क्लिप . 
सगळ्यांनी आवर्जून ऐकावी. 


मनिषा  मुळे 

औरंगाबाद