मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Saturday 17 March 2018

ताळमेळ जुळून येईल..... !


मनिषा  मुळे यांची ऑडिओ क्लिप .
सासर माहेरच्यांनी नवीन नात फुलवण्यास मदत केल्यास  हा ताळमेळ जुळून येऊ शकतो. 


मनिषा  मुळे 
औरंगाबाद   

'तारेवरची कसरत'

ताळमेळ माहेर आणि सासर मध्ये तसे पाहायला गेले तर जीवन म्हणजेच 'तारेवरची कसरत' आहे.
 येथे प्रत्येक जीवाला जगताना बरीच तडजोड करत जगावे लागते त्यात नवीन विशेष असे काही नाही
आणि सर्व करत करत प्रत्येकाला " जीवन जगण्याची कला" हि अवगत होऊन जाते.😄
तसेच स्त्रीयांच्या बाबतीत होते , लग्नानंतर त्यांचे जीवनात बरेच बदल होतात.
 त्यांची राहण्याची जागा, घर, माणसे आणि त्यांचे विचार सुद्धा अगदी अचानक बदलून जातात .
मग सुरु होते तडजोड आणि सुरु होतो प्रवास तारेवरच्या कसरतीचा .....😇
माझ्या माहेरी आई वडील मी आणि माझे भाऊ आणि भरपूर नातेवाईक असे आमचे कुटुंब.
 त्यात मी सर्वांची लाडकी बडबडी हट्टी आणि अभ्यासुकिडा असणारी मुलगी.
माझे लग्न २०व्या वर्षीच झाले त्यामुळे एकदम  सगळ्या जबाबदारी अंगावर आली.
 कधीही कसले टेन्शन न घेणारी मी एकदम टेन्शन मधेच आले
सासरी नवरा आणि सासूबाई एवढेच आम्ही तरीपण स्वभाव अगदी भिन्न ते  एकदम  शांत , शिस्तप्रिय आणि नीटनेटके  राहणारे
आणि मी मनाला वाटलं तस जगणारी, अगदी झोपच यायची नाही सुरुवातीला माहेरची खूप आठवण यायची.
 पण एक बरे होते माझे शिक्षण सुरु होते त्यामुळे माहेरी सारख्या वाऱ्या व्हायच्या त्यामुळे हळूहळू सगळे जमवून घ्यायला शिकले.
पाहता पाहता १३वर्षे झालीत लग्नाला माझ्या आता संसारात चांगली मुरल्यासारखे वाटते.
आता माहेरी जाण्याची ओढ पण जास्त नाही राहिली आठवण येते आई पप्पांची पण फोनमुळे सर्व जवळ जवळ असल्यासारखे वाटते
उलट माहेरी आता वहिनी लोकांचं राज्य असल्यामुळे त्यांच्या मध्ये जास्त बोललेले पण नको वाटते.
  "ज्याचे संसार, त्यांनीच पाहावे " या मताची असल्यामुळे माझे पण मी कोणाजवळ जास्त बोलत नाही.
आधी सांगितलं प्रमाणे प्रत्येकाला "जीवन जगण्याची कला" हि अवगत होऊन जाते
आता बऱ्याच सवयी बदलल्या मी एक समजदार , कर्तव्यदक्ष , प्रेमळ पत्नी आणि आई झाले आहे.
चोवीस तास डोक्यात फक्त घर आणि घरातील लोकांची काळजी असते.
 त्यांच्या आवडी निवडी , त्यांचे शिक्षण परत पुढील भविष्याचे विचार  करण्यात कसा दिवस निघून जातो कळत सुद्धा नाही 


तुमचीच सखी 
"माझे पान"  

"अक्षदा पडल्या, सुनमुख झाले,..

"अक्षदा पडल्या, सुनमुख झाले,..
 झाली आता वरात ,अभिजीतरावांसोबत टाकते पहिले पाऊल घरात,.."
     पंधरावर्षांपूर्वी टाकलेलं हे पाऊल ह्या सासुरवाडीतच इतकं रमले की माहेर असत ह्याची आठवण असली तरी खूप ओढ नाही राहिली ....
       त्याला कारणही तसंच माहेरी बाबा कडक असल्यामुळे ह्यापेक्षा कोणी कडक असेल असं वाटलं नाही,.... माहेरी खानावळ असल्यामुळे 50 लोकांच्या स्वयंपाकाला न घाबरणार्या आम्ही सासरी 4 माणसाच्या स्वयंपाकाला घाबरायचं कारणच नाही,...प्रचंड संघर्ष केलेला असल्यामुळे सासरी डगमगलो नाही,....
     सासुनी मायेने शिकवले घरचे रितीरिवाज,... आणि सासऱ्यानेही दिली कलेला उत्स्फूर्त दाद,....
     ज्या सासूने 15 वर्ष हातात पेन धरला नाही तिनी लग्ना आधी मला चिट्ठी लिहिली होती,....
"घरात जे काही होईल ते या चार भिंतीत ठेव,, भांड्याला भांड लागणारच,....मिळालेल्या चटणी भाकरीत आपण सुखी राहू,...."
 आईची भूमिका सासूने कधीच सुरू केली होती,....
    मी माहेरी गेले तरी त्या म्हणायच्या "लवकर येत जा ग उभे वारे सुटतात ..."
      इतकं प्रेम जिथे तिथे माहेर नकळत सासर झालं आणि सासर माहेर झालं,....
      माहेर आजही आयुष्यात मिठासारखं आहे,....वर्षभरातली छोटीशी नमकीन भेट,....पण सासर मात्र सगळं आयुष्य व्यापून आहे कारण तिथे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात माझ्यासाठी अतोनात प्रेम आहे,.....
      कुणाला वाटेल काय ही बाई सासरातच रमली,...पण मला आजही वाटतं माझ्या मुलीलाही असच सासर मिळावं आणि माहेरचं स्थान तिच्या संसारातही मीठाप्रमाणे रहावं........

                   💐स्वप्ना