मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Saturday 17 February 2018

मुलगी जणू संस्कारच व्यासपीठ !


जरुर ऐका !

माधवी शहाणे यांची जन्मताच मुली असुरक्षित का?  या विषयावरील ऑडिओ क्लिप. 

माधवी शहाणे 
औरंगाबाद

स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे .

दिल्लीतील ८ महिन्याच्या मुलीवर रेप हि घटना मनाला चटका लावून गेली . आणि जन्मताच मुली असुरक्षित का ? असं वाटायला लागलं. पूर्वीच्या काळी मुलीचा गर्भ  वाढतोय असे कळले तर गर्भ काढण्यात येत असे, हुंडा द्यावा लागतो म्हणून  मुलीचा जन्म नको वाटायचं, कधी घरच्यांच्या दबावा मुळे मुलीचा जन्म नाकारण्यात यायचा.  पण आता मुलगी जन्मायच्या आधीच  माझ्या मुलीवर रेप तर होणार नाही ना ?  अशी भीती वाटायला लागली आहे. यामुळे मुलींच्या जन्मदर कमी होण्यास काहीच वेळ लागणार नाही.

काही घटना अशा आहेत कि  शाळा, कॉलेज, क्लासेसचा रस्ताही आता मुलींसाठी सुरक्षित राहिला नाही असेच  म्हणावे लागेल. वर्तमानपत्र वाचायला घेतले की, हल्ली याच बातम्या जास्त असतात. आजकाल माध्यमांच्या अति खुलेपणामुळे, अतिरंजीत चित्रपट, मालिका यांचे प्रक्षेपण यांचा प्रभाव लोकांवर होत असल्यामुळे, अशा घटनांना मोकळीक मिळत आहे.

खूप दिवसांपूर्वी एक जाहिरात खूप प्रसिद्ध झाली होती. आई पाहिजे, पत्नी पाहिजे, बहीण पाहिजे , मग ....... मुलगी का नको ? पण आता अशी वेळ आली आहे कि घरात मुलगा आणि मुलगी दोघेही पाहिजेत. मुलीला आणि मुलाला समान  वागणूक  दिली गेली पाहिजे . म्हणजे यातून मुलगा मुलगी असा भेदभाव निर्माण होणार नाही.  दोघेही एकमेकांचा आदर करायचा शिकतील. हि सुरवात आधी घरापासून करणे आवश्यक आहे. 

मुली आणि महिलांविषयी आदरभावना मुलांच्या मनात निर्माण होण्यासाठी शाळा, समाज आणि कुटुंब या तिघांचीही जबाबदारी आहे. असे प्रसंग घडले तर कोणालाही न घाबरता शिक्षक, पालक समाज यांना सांगता यावा, ‘गुड टच, बॅड टच ‘ या विषयी माहिती मुलांना घरातून  शाळेतून देण्यात यावी तेही कोणतीही लाज न बाळगता. असे समुपदेशन प्रत्येक पालकांना सुद्धा करणे गरजेचे आहे. आणि शाळेत सुद्धा घेणे गरजेचे आहे. सुरक्षितता हा प्रत्येक मुला मुलीचा अधिकार आहे, कोणालाही  त्यांचे सुंदर आयुष्य विस्कटुन  टाकण्याचा किंवा त्यांचे जीवन अंधःकारमय करण्याचा हक्क नाही.


चला तर मग मुलांना स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे शिकवुया आणि समाजाच्या विकृत गुन्हेगारी पासून दूर ठेवूया.

सीमा लिंगायत कुलकर्णी

पुणे

पॉसिटीव्ह च बोलले पाहिजे

"जन्मताच मुली असुरक्षित" विषयचा  विचार येताच मनात वेगवेगळे विचार येऊ लागतात ,
 खरंआहोत का आपण हि सुरक्षित ?
नेमका थोड्या दिवसाआधी  " पद्मावत " बघितला तेव्हा विचारांचे काहूर पेटले डोक्यात,
खरंच आहोत का आपणही सुरक्षित ?

किती वेळ लागतो आपल्याला नेगेटिव्ह विचार करायला अगदी क्षणभर हि नाही लगेच
वारे वाहू लागतात नेगेटिव्हिटीचे , त्यामुळे मनावर ताबा ठेवून थोडे प्रॅक्टिकली विचार करून
जेव्हा विचार करू तेव्हा आपण आपल्या समस्या सोडवू शकू . 
नेमके काय आहे "स्री "ना आपण मुळातच  खूप हळवी असते त्यामुळे तिला तिच्या
भावना लगेच मांडता येत नाहीत मात्र तिच्या डोळ्यातून तिला काय वाटले हे लगेच कळते .
पुरुषप्रधान संस्कृतीत आपण राहत आहोत , कितीही स्त्री वर्ग पुढे आला असला तरी समाजात
 वावरतांना आपण आपल्या मर्यादा सांभाळूनच राहावे .आपल्या घरापासूनच सुरुवात करावी
मुलामुलींना सारखीच वागणूक द्यावी 

मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे . दोघांचेही अगदी वेगवेगळे स्वभाव , सवयी आहेत. 
आम्ही दोघांनाही सारखेच लाड करतो ,पण मुलीची जरा जास्तच काळजी घेतो हे मलाही वाटते .
 खरंच एवढे बिनधास्त मी तरी माझ्या मुलीला सोडेल असे मला वाटत नाही ,
नक्कीच अजून लहान आहेत दोघेही पण वेळ आल्यावर दोघानाही समजवून सांगणे गरजेचे आहे .
 कितीही मोर्डेन विचार आपण ठेवले तरी आपली "मुले " हि आपली जबाबदारी आहेत,
त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हे आपले कर्त्यव्य आहे आणि जगाची ओळख त्यांना
आपल्या विचारातून होत असते , त्यामुळे आपण पॉसिटीव्ह च बोलले पाहिजे आतापासून
त्यांना भ्रमिष्ट न करता ,त्यांना काय योग्य काय अयोग्य याचे शिक्षण  द्यायलाच हवे. 
मुलापेक्षा मुली ह्या खूप जिवाच्या आत असतात हे मात्र नक्की , त्यामुळे त्याची काळजी करणे ,
सुरक्षितता  पाहणे हेही साहजिकच.
तुमचीच सखी 
माझे पान  

मूल सुरक्षित आहे का ?



राजश्री कुलकर्णी यांचे '' जन्मताच मुली असुरक्षित का?'' यावर अप्रतिम अशी ऑडिओ क्लिप . 
सगळ्यांनी आवर्जून ऐकावी. 

राजश्री कुलकर्णी 
औरंगाबाद

थोडं बिनधास्त थोडं धडाडीने !

एका पुस्तकात वाचलं होतं....आपल्या विचारानुसार आपल्या भोवती व्हेवज निर्माण होतात आणि,,,आणि घटना घडत राहतात त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा,,,,

       मला पटली ही गोष्ट आणि मी ती आत्मसात केली,,, हे ह्या विषयात सांगण्याचं कारण की रस्त्यावर चालताना काहीही होऊ शकतं तरी आपण काळजी घेऊन चालावं अस असलं तरी कुठेतरी काहीतरी घडतच पण म्हणून आपण रस्त्यावर चालणं सोडून देतो का हो?,,,, नाही ना.....मग हेच दोन्ही धोरण आपण मुली मोठया करताना बाळगू यात ना,,,कारण कस आहे आई गर्भ राहिल्यापासून निगेटिव्ह विचार करते मुलगी झाली तर कस होईल?कसं सांभाळावे? जग इतकं वाईट आहे,,,,मुलींचं अवघडच आहे?

        अरे असे निगेटिव्ह विचार करून आपण तेच तेच वातावरण निर्माण करतोय,,,,,अगदीच नाही असं नाही आहेत काही गोष्टी पण म्हणून काय तेच डोक्यात ठेवून जन्म देणार का आपण त्यांना?,,,,,आणि वाढवणारही तसच आयुष्य स्ट्रेस मध्ये ठेवून,,,,,

     मला मुलगी आहे,, मला माझ्या नातेवाईकांच्या सूचना ती 3 वर्षाची असल्या पासून तिला सांग कुठे कुठे हात लावू  द्यायचा नाही,,,,,अहो हो अजून तिला तर धड हाता पायांची ओळख होऊ द्या,,,,, माझी एक बहीण अनिमेटेड व्हिडिओ पाहून त्यात मुलींना कसे हात लावतात ते दाखवून बेचैन,,,,,फार अवघड असत ग कुठे कोणाकडे पाठवायचं नाही त्यांना सूचना द्यायच्या,,,,,,

      अग मान्य हे सगळं पण त्यासाठी आयांनी असंच होत हेच जग आहे हे जरा डोक्यातून काढा ,,,थोडं बिनधास्त थोडं धडाडीने हे आधी स्वीकार ही एक बाजू आहे जगात पण पॉझिटिव्ह जगपण खूप छान आहे,,, जगणं खूप सुंदर आहे,,,,

         सुरक्षित पूर्ण नसल्या तरी असुरक्षितच आहेत असेही नाही,,

        आपणपण एक स्त्री म्हणून मोठं होतोय आपले अनुभव बघा,,, आता जरी वाईट गोष्टी वाढत असल्या तरी सुविधापण किती आहेत,, मोबाईल आहेत ट्रॅकर aap आहेत,, महिला कायदे आहेत,,, मी रोज 100 किलोमीटर प्रवास करून जाते,,,माझ्या स्टाफमध्ये एकही लेडी नाही पण ते स्वीकारून पॉझिटिव्हली जेव्हा घेते तेव्हा त्रास होत नाही,,,

       असुरक्षितता नाही असं नाही पण आपण ती मिठा सारखी स्वीकारू तीच प्रमाण आपल्या विचारांनी वाढू देऊ नका ....

       थोडं पॉझिटिव्ह पणे आयुष्य जगू यात आणि मुलींना वाढवू यात म्हणजे या पॉझिटिव्ह व्हेवज कदाचित वाईट वृत्तीना मोडीत काढतील ,,,आणि मग ह्या चिमण्या आनंदाने कुठलीही भीती न बाळगता उंच उडतील 
         
एका मुलीची आई
                  🙂स्वप्ना