मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Saturday 3 February 2018

गॅझेट आणि मुले


























सध्याच्या काळात दूरदर्शन नाही असे घर सापडणे अवघडच. टीव्हीचे जसे
फायदे तसे तोटेही आहेत. विशेष करून लहान मुलांवर याचा जास्त परिणाम होतो.अगदी 2 वर्षाचे बाळ सुदधा सगळे काही समजत असल्यासारखे टीव्ही पाहतो.चित्रआणि आवाजामुळे तो पटकन त्याची नक्कल करतो. मागे एकदा छोटा भीममालिका चालू होती. छोटा भीम बघून मुलांना वाटायचे की लाडू खालला कीसगळ्यांना हारवता येते, खूप शक्ति येते, किती उडया मारले तरी लागत नाही .मोबाइल तर मुलांचे एक खेळणेच होऊन बसले आहे. किती सहजासहजी तेअप्प्स बदलतात, डाउनलोड करतात, प्ले गेम मध्ये जातात इत्यादी हे सर्व बघुन
खूप नवल वाटते, जसे काही त्याला पूर्ण वाचता येतय !!!

बाळाला गिफ्ट म्हणून एखादी रिमोट कंट्रोल ची गाडी दिली तर ताबडतोब पेपरफाडून वगैरे गाडी बाहेर निघते. रिमोटने गाडी चालवण्यात तो गुंग होऊन जातो आणि गाडी चालत नसेल तर तो उकलून पाहतो. टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप,कम्प्युटर, गाडी तसेच इतर कोणतेही ईलोक्ट्रोनिक उपकरण असो, मुले त्यातपुर्णपणे रमून जातात .त्याला न खाण्याचे भान असते न झोपण्याचे ,,,,पालकांनी याची चिंता करणे जरूरी आहे,वास्तविक पाहता आपण इथेच खूपमोठी चूक करतो. त्याचे नको इतके कौतुक केल्या जाते .लाड करण्याच्या नादात वय विसरून जाऊन त्याने जे मागितले ते आपण देऊन टाकतो. मुलांना एका मर्‍यादे पर्यन्त ही साहित्य दिली पाहिजेत .

आजकालची मुले त्यांना खेळण्यास काही देत नाही तोपर्यंत जवळ सुध्धा येतनाहीत. चॉकलेट, कॅडबरी पेक्षाही मोबाइल जास्त प्रिय असतो. कितीच्या किती वेळते रमून जातात .

जसे जसे ते वापरत जातात तसतसे त्यांची क्षमता वाढण्यास मदत होते.
वेगवेगळी स्किल वापरू शकतो. बुध्दिमत्तेत वाढ होते . त्याच्या व्यक्तिमत्वातफरक पडतो.पाठांतर लवकर होते. इतरांचे संभाषण ऐकून ऐकून बाळाची भाषा सुधारते,सगळ्या सारखे तो कपडे मागतो.एकूणच प्रगति जास्त !!!!मुलांच्या ईलोक्ट्रानिक वापरावर आपणच बंधने घातली तर काही नुकसान नाही पण आई , वडील सतत कोणत्या न कोणत्या स्क्रीन वर बिझी असतील तर त्याचेअनुकरण मुले करतात , व्हाट्सअप,फेसबुक या आणि इतर माध्यमाचा उपयोग लहान मुलेही अगदी सर्रास करतात,म्हणूच बाळ काय करतय ,काय खेळ्तय तसेचकोणाबरोबर च्याटिंग करतो यावर घरातील मोठ्यांनी लक्षं ठेवले तर मुलांच्या प्रगतीत वाढ होते.

शिवांगी कुलकर्णी
औरंगाबाद 

मोबाइल माझा गुरू


एकविसाव्या शतकातील अख्खी पिढी ही टेक्नोलॉजिला अॅडीक्ट आहे. ही पिढी स्वत: ला गॅझेटमध्ये रमवून घेते. यात गेम्स, शैक्षणिक अॅप्स, म्युझिक आणि बरेच काहींचा समावेश आहे. 
आजच्या आर्इ (मम्मी) गरोदरपणी मुलांची घ्यायची काळजी, वजन कसे वाढवावे, काय खावे, काय प्यावे, किती वाजता झोपावे, कोणते व्यायाम करावे आदीं गोष्टींसाठी वेगवेगळ्या अॅप्सवर अवलंबून असतात. 
मुलं जन्माला आल्यावर मुलांची वाढ कशी करावी, त्यांना काय खायला द्यावे, त्यांच्या आजारपणात काय काळजी घ्यावी अश्या अनेक गोष्टींची माहिती अॅप्स घेतात. त्यामुळे पुढे ही मुलं थोडी मोठी झाली की, आर्इ- बाबांचा मोबाइल घेऊन लॉक उघडून वेग-वेगळी गेम्स खेळतात कारण घरात आर्इ- बाबा नोकरी करतात. तार्इ- दादा शाळेत जातात. आजी-अजोबा वृध्दाश्रमात असल्यामुळे या लहान मुलांचा मोबाइल हाच गुरू झाला आहे. 

लहान अवघ्या आठ महिन्याचे मुलं हे मोबाइल बालगीते पाहिल्याशिवाय जेवण करत नाही. तर काही मुलं बाहेर गेल्यावर आर्इ- बाबांना त्रास देतात म्हणून हा घे फोन आणि शांत बस असा सल्ला पालकच देतात. यात या मुलांची काही चुक नाही किंवा पालकांची सुध्दा काहींची नाही. हा बदल आहे तो येणा-या परिस्थितीचा. परंतू याकडे आपण सकारत्मकपणे पाहिले पाहिजे. 
अवघी दोन वर्षांची मुलं या अॅप्समुळे प्राणी, पक्षी ओळखू लागले. रंग- आकार समजू लागले. मराठी- इंग्रजी बाराखडी,
अंक गणित ऐकून म्हणू लागले. हा बदल चांगला आहे. या मुलांना काही सांगण्याची गरज नाही. ते आपले आपणच शिकू लागले आहेत. ही चांगली बाब आहे. काही अॅप्स असे आहेत की त्यात श्लोक, आरत्या, गोष्टी अश्या ब-याच गोष्टी एकत्रित समावेश केला आहे. त्यामुळे मुलं आता श्लोक म्हणू लागली आहेत. तसेच ऑडिओ बुकमुळे मुलांना आता पुस्तक ऐकण्याची सवय लागली आहे.
त्यामुळे आपणच याकडे दृष्टीकोन बदलून पाहणे आवश्यक आहे. ही बद्दलाची नांदी आहे. आगामी काळातील डिजिटल एज्युकेशनचे पाऊल पडते पुढे. त्यामुळे मुलं आता डिजिटल होऊन शिक्षण घेतील.

प्रतिक्षा परिचारक - पाठक
औरंगाबाद 

गॅझेट चा वेगळाच अर्थ.

पूर्वी रोजचा दिवस सुरु व्हायचा तो रेडियो किंवा वर्तमानपत्राने आणि संपत होता तो कुटुंबातल्या वेगवेगळ्या विषयांनी, पण आता रोजचा दिवस सुरू होतो इंटरनेटनं आणि संपतोही इंटरनेटनं ! इंटरनेटमुळे जग कसं जवळ आलंय ज्ञानाची गंगा उपलब्ध झाली आहे. पण आपल्यापैकी कितीजण या इंटरनेटच्या जाळ्यात अडकली आहेत हे पाहणंही फार गरजेचं झालंय. इंटरनेटच्या व्यसनामध्ये काही प्रकार आहेत ऑनलाइन गेम खेळणं, माहिती गोळा करत सुटणं, बाजारात येणारी नवनवी गॅजेट विकत घेत रहाणं आणि  लहान  मुलान  मध्ये प्रत्येक गॅजेट आपल्याकडे असायलाच हवं, असा अट्टहास असणं,

इलेक्‍ट्रॉनि गॅझेट चा अर्थ लहानसहान कामासांठी उपयोगी पडणारे साधन यंत्र असा होतो. पण हि बातमी वाचताना गॅझेट चा नवीन वेगळाच अर्थ समजतो, बडोद्यातील एका तेरा वर्षांच्या मुलीने स्वत:चे महागड्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स गॅझेट्‌सचे व्यसन पूर्ण करण्यासाठी चक्‍क वेश्‍याव्यवसायाचा मार्ग स्वीकारला. फार पूर्वीपासून महागडे मोबाईल, आयपॅड आणि लॅपटॉपचे आकर्षण होते. या मुलीची आई येथे एक बांगड्याचे दुकान चालविते. घरची कमाई फारच कमी असल्याने या मुलीला महागडे गॅझेट्‌स खरेदी करणे शक्‍य होत नव्हते. अखेर आपली हौस पूर्ण करण्यासाठी तिने वेश्‍याव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. एका खासगी वापराच्या मोबाईलच्या माध्यमातून ही मुलगी विशिष्ट व्यक्‍तींशी संपर्क साधत आणि त्यांच्या माध्यमातून देहविक्रय करत असत. जेव्हा ती गर्भवती असल्याचे तिच्या आईला समजले तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला. हि बातमी मनाला चटका लाऊन गेली.

क्षणभर मी मागे गेले पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या  तीन  माणसांच्या  मुलभूत  गरजा  आहेत  अस  सागितलं  जायचं, त्यात बदल होऊन मग आरोग्य, शिक्षण समाविष्ट झाले. आता तरुणांच्या (५ ते १५  वयोगट) बाबतीत गॅझेटसुद्धा जीवनावश्‍यक गोष्टच बनली आहे. लहान मुलांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक गॅझेट्‌सची क्रेझ इतकी वाढत आहे की ते एकलकोंडे होत आहेत आता याच व्यसनापायी त्यांची पावले भलत्याच दिशेला पडताना दिसत आहेत. देशाच्या महागरांमधील 5 ते 12 या वयोगटातील 82 टक्के मुलांकडे मोबाईल, टॅबलेट आणि "आयपॅड‘, अशी "गॅझेट्‌स‘ आहेत. "गॅझेट‘च्या अतिवापरामुळे मुलांमध्ये सामाजिक विजनवास, नैराश्‍य, निद्रानाश, चिंता, जाडेपणा, मानसिक अनारोग्य, अशा समस्या निर्माण होत आहेत, असे "ऍसॉचॅम‘च्या अहवालातून समोर आले आहे. 

जग झपाट्याने बदलतंय. त्यांना समजून घेण्यासाठी चौकटीच्या बाहेरचा विचार करण्याची गरज आहे. आपण त्यांच्या आजच्या काळातील गोष्टीत इंटरेस्ट दाखवला तर आनंदाने संवाद साधल्या जाईल. पैशाची किंमत त्यांना कळायला हवी त्यासाठी त्यांना विश्वासात घेऊन घरच्या आर्थिक परिस्थितीची माहिती द्यावी व त्यात त्यांना सहभागी करून घेतले तर, ते खूप हुशार आहेत त्यातून ते मार्गही सुचवतील. .सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना ऐकाल तर ते तुम्हाला ऐकतील व सगळ्या विषयांवर मोकळेपणाने संवाद साधता येईल.


सीमा लिंगायत  कुलकर्णी
पुणे