मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Friday 8 March 2019

महिलादिना निमित्त "स्त्री संता '' विषयी



महाराष्ट्र हि एक संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. त्यात काही स्त्री संत देखील होऊन गेले आहेत. 
||संत जनाबाई ||
संत नामदेवांच्या सहवासात राहून विठ्ठल भक्तीचा ध्यास घेतला होता. म्हणून त्यांची ओळख संत कवयित्री जनाबाई अशी होती. विठू माझा संत जनाबाई यांचा प्रसिद्ध अभंग. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून अजूनही  स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना संत जनाबाईच्या ओव्या गातात.

लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।
स्त्रीजाणीव करून देणारा त्यांचाडोईचा पदर आला खांद्यावरी। भरल्या बाजारी जाईन मी हा अभंग
संत जनाबाईंच्या नावावर एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत.

||संत सोयराबाई||

अभंगामधून जगण्याचे वास्तव रोखठोक पणे सांगणे हि संत सोयराबाईंची ओळख होती. सोयराबाई यांना संजकडून खूप त्रास सहन कराव लागला होता .

अवघे दु:खाचे सांगाती दु:ख होता पळती आपोआप
आर्या पुत्र भगिनी माता आणि पिता हे अवघे सर्वथा सुखाचेचि

आता आता कुठे विटाळ (पाळी ) कडे बघ्यांच्या लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे पण . पण सातशे वर्षांपूर्वी देखील याबद्दलचे  त्यांचे विचार हे या अभंगातून दिसून येतात ..त्यांनी असा थेट प्रश्न केला होता कि देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला?

‘’देहासी विटाळ म्हणती सकळ
आत्मा तो निर्मळ शुदध बुद्ध
देहीचा विटाळ देहीच जन्मला
सोवळा तो झाला कवण धर्म’’

त्यांच्या जास्तीत जास्त परखड , वास्तवदर्शी , दुःखद  असे अभंग आहेत .सोयराबाईंचा रंगी रंगला श्रीरंग। अवघा रंग एक झाला हा प्रसिद्ध अभंग आजही तेवढ्याच आवडीने ऐकला जातो.

।। श्री संत वेणाबाई ।।

बहू कष्टलो पातलो जी स्वदेशा !
प्रजा बोलती कौल दे राघवेशा !!

मध्ययुगीन काळात विधवा स्त्रीने कीर्तन करणे हि एक क्रांतीच असायची पण वयाच्या १० व्य वर्षी विधवा झालेल्या संत वेणाबाईंनी समर्थ रामदासांचे शिष्यत्व स्वीकारून त्या कीर्तन करू लागल्या. स्त्री-शिष्यांपैकी फक्त वेणाबाईंनाच उभे राहून कीर्तन करण्याचा अधिकार मिळाला होता. 
वेणाबाईंच्या शैली हि वेगळीच आणि उठावदार होती. त्या स्वतः  गीतरचना, अभंग रचना करतच, आणि त्यासोबत गट देखील असत.  दासविश्रामधामया ग्रंथाचे कर्ते आत्मारामबुवा वेणाबाईंचे वर्णन फार छान करतात.

धन्य वेणाई वेणुमोहित।
वेणुविण गाय सप्रेमयुक्त।।
वेणुधर हरि होय तटस्थ
वेणांकधरवाणी मोहळे।।

||संत महदंबा||

महानुभाव पंथातील एक व्यक्ती आद्य कवयित्री महादंबा किंवा महदाइसा . त्यांच्या जन्म मराठवाड्यातील जालना येथे झालेला आहे. महदाइसा ही चक्रधरस्वामींची शिष्या होत्या. महदाइसेचे लीळाचरित्र’, ’श्री प्रभुचरित्र’, ’स्मृतिस्थळधवळेहे चार ग्रंंथ प्रसिद्ध आहेत. महानुभाव पंथातील महदंबाकृत धवळे हे एक रसाळ काव्य आहे. या काव्यामुळे महदंबेकडे आद्यकवयित्रीचा मान आहे.
एक रसाळ रचना

ऐसें मान आइकौनि मानवले जगन्नाथु :
दारुकाकरवीं आणविला रथु :
अरूढले कृष्णनाथरावो सरिसा विप्र जो आनंदें निर्मरु :
कव्हणा नेणतां देवो चाले कौंडण्यपुरा वेगवतरु :

||संत मुक्ताबाई ||

मराठी साहित्याचे दालन ज्यांच्या मुळे संपन्न झाले आहे अशा ज्ञानदेवांच्या भेनी म्हणजे मुक्त बाई . मुक्ताबाई यांनी ४१ अभंग लिहली आहेत . मुक्ताबाईंचा असा विश्वास होता की संत म्हणजे इतरांवरील टीका स्वीकारणे म्हणून त्या म्हणाल्या , “संत जेणे वहावे,जग बोलण सोसावे मुक्ताबाई यांना मुक्ताई या नावानेही ओळखल्या जाते.

||श्री संत कान्होपात्रा||

या १५ व्या  शतकातल्या  मराठी कवयित्री . आजही मनाचे स्थान आणि विठ्ठल भक्तीचा अभंगरचना  लाभलेल्या कवियत्री म्हणून त्यांची ओळख आहे. कान्होपात्रा या दिसायला खूप सुंदर ,देखण्या होत्या त्यामुळे त्यांना  बिदरच्या बादशहाने पकडून जाण्यास सांगितले तेव्हा त्याच्या मदतीला कोणी धावून आले नाही आपले शील भ्रष्ट होऊ नये म्हणून त्या पंढरपूर्ला गेल्या  पांडूरंगाच्या पायास कडकडून मिठी मारली व आर्तवाणीने पांडुरंगाचा धावा केला आणि तिथेच आप्ले प्राण सोडले.

नको देव राया अंत असा पाहू । प्राण हा सर्वता जावू पाहे ॥
हरीणीचे पाडस । व्याघ्रे धरीयले । मजलागी झाले तैसे देवा ॥
मोकलून आस । जाहले उदास । घेई कान्होपात्रेस ह्र्द्यात ॥

कान्होपात्रा यांचे ३३ अभंग सकल संत गाथाया ग्रंथात समाविष्ट झाले आहेत.

|| संत बहिणाबाई ||

'जुन्यात चमकेलं आणि नव्यात झळकेलं असे बावनकशी'अशा प्रकारे सोन्यासारखे त्यांचे काव्य आहे. असा अभिप्राय त्यांना आचार्य अत्रे यांनी बहिणाबाई याना दिलेला आहे.

अरे खोप्यामधी खोपा, अरे संसार संसार, धरित्रिच्या कुशिमधे, बिना कंपाशीनं उले,मन वढाळ वढाळ, माझी माय सरसोती,

बहिणाबाईंच्या कवितांचा विशेष विषय म्हणजे मनुष्याचा जन्म ,जीवन, मृत्यू यावर आधारित असायचा . त्यांच्या काही काव्यातून मनुष्य आपले पोट भरण्यासाठी कसा प्रयत्न करत असतो. किती कठीण गोष्टींना तोंड द्यावे लागते.

म्हणजे पूर्वीच्या काळी देखील मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, सोयराबाई, निर्मळा, भागु आणि कान्होपात्र यासारख्या अनेक स्त्री संतांनीच आपल्या भारूड, भक्ती, कीर्तन, ओव्या , अभंग यातून एकोपा कसा वाढवावा , अन्यायाविरुद्ध कसे लढावे, धर्मभाव विसरून एकत्र कसे राहावे हे शिकवले आणि यातूनच भावसंपन्न मराठी कविता समृद्ध  झाली . 

सीमा लिंगायत  कुलकर्णी
पुणे

बहीण प्रेमाचा झरा - संत मुक्ताबाई

  
आज जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा होत आहे. त्यानिमित्ताने बहीण प्रेमाचा झरा देणाऱ्या संत मुक्तबाई यांच्या जीवनातील काही गोष्टीचा उलगडा पाहूया.

महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यात पुरुष बरोबरीने महिला संतानीही समाज प्रबोधनात खूप मोठा हातभार लावला आहे. त्यात संत मुक्ताबाई यांचा उल्लेख करावा लागेल. संत मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत-कवयित्री होत्या. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे त्यांचे थोरले भाऊ होते.

संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. परंतु त्यांनी स्वतःचेही स्वतंत्र व्यक्तीमत्व निर्माण केले आहे. 
त्यांनी रचिलेले ''ताटीचे अभंग'' हे त्यांच्या नावावर नोंद झाली आहे. या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना काही बोध दिला आहे. त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत्या. त्यांनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे.  ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.

त्यांचा जन्म शके ११९९ किंवा शके १२०१ मध्ये आश्विन शुद्ध प्रतिपदेला (घटस्थापना) झाला असा उल्लेख आहे. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, मातापित्यांचा देहत्याग, ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद, विसोबा खेचर यांचे शरण येणे हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग. शुद्धिपत्र मिळविण्यासाठी चौघे भावडं पैठण गावी आले. “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” अशी आर्जव मुक्ताईने ज्ञानेश्वरांना केली होती. ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरीची निर्मिती करण्यातही मुक्ताबाईचा मोलाचा वाटा आहे. 
मुक्ताबाईने चांगदेवाना ‘पासष्टी’ चा अर्थ सांगितला. त्यानंतर चांगदेव महाराज मुक्ताबाईचे पहिले शिष्य झाले. मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांच्या कृपेचाही वर्षाव झाला होता. त्यानंतर मुक्ताबाईला अमृत संजीवनीची प्राप्ती झाली.

मुक्ताबाई यांची अभंग निर्मितीही अतिशय अर्थपूर्ण आणि समाजाभिमुख आहे. त्यांच्या अभंगातून सर्वांच्या जीवनाच्या अनुषंगाने उल्लेख आढळतो. यातून त्याची माहिती कळते लहान वयात त्यांनी केलेले हे कार्य मोठे आहे. 

अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर हे बहीणा बाई ची कविता आपण नेहमी अनुभवतो. परंतू संत मुक्ताबाई यांनी आपल्या मोठ्या भावंडंसोबत राहून आयुष्याचे अनेक अर्थ सांगितले. 

अशा या संत मुक्ताबाईस विनम्र अभिवादन

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...

प्रतीक्षा परिचारक-पाठक
औरंगाबाद

एका शिंपल्यातला मोती -वेणाबाई




एका तर मग , 
ऑडिओ च्या रूपात महिलादिना निमित्त मनीषा मुळे यांनी  ''स्त्री संत'' वेणाबाई यांच्या बद्दलची सांगितलेली माहिती .

मनिषा  मुळे 

औरंगाबाद  

स्त्री संत- कलावती आई


बेळगाव निवासी .पु कलावती देवी यांचा जन्म ऋषीपंचमीच्या दिवशी कारवार येथे झाला .त्यांचे बालपण अतिशय सात्विक  धार्मिक वातावरणात गोकर्ण येथे गेलेत्याकानडी इयत्ता  थी  शिकल्या होत्यात्यांचा विवाह वयाच्या १७ व्य वर्षी झाला १९ व्यावर्षी वैधव्य आलेअवघ्या चार वर्षाचा संसार पण तो हि अगदी छान . त्या म्हणायच्या ज्याला ज्याला संसार चांगला करता आला तो परमार्थात कधीच कमी पडत नाही . पतीची सेवा म्हणजे गुरुसेवा होय . स्वतःच्या अल्पवयीन मुलांना आईकडे ठवून त्या गुरुप्राप्तीसाठी घराबाहेर पडल्या . त्यांचे गुरुहुबळीचे 'सिद्धारूढ महाराज' गुरुसेवा चांगली झाल्यामुळे लवकरच त्यांच्यावर गुरुकृपा झाली ।।ॐनमः शिवाय ।। हा गुरुमंत्र घेवून अज्ञानांचे अज्ञान दूर करण्यासाठी, हरिनाम प्रचारासाठी त्यांनी देह झिजविला.
भक्त त्यांना 'आई' म्हणत. आई कायम म्हणायच्या आपले लक्ष देवाकडे गेले कि देव आपल्या संकटी धावून येतोच. दिवसभरातून एक तास तरी देवाचे समरण करावे , त्याच्या सत्त्तेशिवाय काहीही  नाही त्या प्रापंचिकांनाही स्वछता, काटकसर कशी करावी हेही सांगत . त्या म्हणायच्या एक पैसे शोधण्यासाठी चार पैस्याचे तेल वाया घालवू नये. आवश्यक तेथे जरूर पैसे खर्च करावा. आईंनी प्रापंचीक  व परमार्थीक  मार्गदर्शन पर स्वलिखित अल्पदरातप्रकाशन काढली.सतत नामघेतल्याने संकटाशी झुंज देण्यास बळ मिळते परंतु नाम घेतांना पथ्य सांभाळावी जसे खोत बोलू नये., मनात कपट ठेऊ नये. दुसऱ्यांचे वाईट झाल्यास आनंद मानू नये व देवावरपूर्ण विश्वास ठेवावा . तो जे करतो ते चांगल्यासाठीच हा विश्वास ठेवावा आई सांगतात आपण आगगाडीने प्रवास करताना सामान डोक्यावर घेवून बसतो का?नाही ना! कारण आपल्या बरोबर आपले सामान येणारच , तसेच प्रपंचाची काळजी करू नये. तो कर्ताकरवीत आहे. प्रश्न तो देतो तर उत्तरही तोच देतो. आपण फक्त त्याचे सतत स्मरण ठेवावे.
प.पु आईंनी ८ फेब्रुवारी ७८ रोजी आपला देह ठेवला . पण मनाने आजही आई आमच्या हाकेला धावून येतात त्यांच्या सारखे गुरु आम्हाला लाभले हे आमचे पूर्व पुण्य अश्या स्त्री संत प. पू. कलावती देवी (आईंना )माझे कोटी कोटीप्रणम्य कलयुगात हि भवनदी पार करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आमच्यावर आहे म्हणूनच-

'मरतो तो गुरूंनाही,रडतो तो शिष्य नाही'

।। सद्गुरू सारिखा असता पाठीराखा.
इतरांचा लेख कोण करी ।।

 माधवी शहाणे 

औरंगाबाद