मोकळा श्वास .......!

मोकळा श्वास .......! मैत्रिणींसाठी हक्काचं व्यासपीठ.

Sunday 8 April 2018

१२ वे वर्ष धोक्याचे

१६ वे  वर्ष धोक्याची असं म्हणतात खरे पण आजकाल तर ते १२ वे वर्ष वरच आलेले दिसते 
आजकाल घरातील आणि बाहेरील वातावरण असे झाले आहे कि मुलांना समाज हि फारच लवकर येत आहे . 
आधी वर्षाने माणसाची वाढ होत असे आजकाल ते दिवसावर आलेले दिसते  आधी जन्माला आलेले मूल हे सात आठ दिवस हाताची मूठ उघडत नव्हते आजकाल तर जगात आल्या आल्या हात पाय हलवू लागतात . 
खरंच आयुष्य कमी झाल्यासारखेच वाटायाला लागले आहे, एवढे पटापट मुले मोठी होतात ना कि 
वेळ केव्हा निघून जातो कळत सुद्धा नाही. वयात आल्यावर तर विचारूच नको कसे अगदी फार मोठे झाल्यासारखे वागू लागतात मला तरी वाटतं १६व वरीस धोकयाच म्हणण्यापेक्षा १२व वरीस धोक्याचं म्हणता येईल आता, या वयात मुलाच्या प्रश्नांची उत्तरे देणे खूप अवघडल्यासारखे होऊन जाते. स्पष्ट त्यांना विचारता हि येत नाही आणि व्यक्त हि होता येत नाही आणि  T.V , शाळेतील वातावरण याचा हमखास परिणाम मुलांच्या डोक्यावर होत असतो आणि ते वाट चुकू नये म्हणून खबरदारी घेणे हि पालकांची जबाबदारी असते त्यामुळं घरात सुसंवाद ठेवणे , मुलांनी आपल्याजवळ  व्यक्त होणे त्यांना पुरेसा वेळ देणे त्यांचं म्हणणं शांतपणे  ऐकून घेणे , योग्य त्या वयात योग्य  त्या गोष्टी समजावणे हे हि आपले महत्वाचे कर्तव्य  आहे.